आटी स्थापना लहुजी शक्ती सेनेचा धाराशिव येथे आद्य क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे चौकामध्ये पेढे वाटून जल्लोष
आटी स्थापना लहुजी शक्ती सेनेचा धाराशिव येथे आद्य क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे चौकामध्ये पेढे वाटून जल्लोष
अभिनंदनीय निवेदन करुन लहुजी शक्ती सेना व समस्त मातंग समाज यांच्या वतीने मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या माध्यमातून सरकारने आर्थसंकल्पीय अधिवेशनात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, मातंग समाजासाठी बाटी प्रमाणे आर्टीची स्वतंत्र स्थापना करुन मातंग समाजाला न्याय दिलेला आहे. त्यामुळे सरकारचे खूप खूप अभिनंदन त्याच बरोबर मातंग समाजाच्या इतरही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून त्याप्रमाणे मातंग समाजाला एस.सी. मध्ये अ.ब.क. ड वर्गीकरण करुन स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक सुरु करण्यात याचे ही या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना देण्यात आले
यावेळी शिवाजी भाऊ गायकवाड जिल्हा कार्याध्यक्षसंतोष मोरे ,मारुती लोंढे , विजय शिरसागर शुभम लोंढे ,अमोल कांबळे ,रोहित गायकवाड ,राहुल ताटे, बळीराम ताटे ,खंडू शिंदे ,ओंकार पेठे
धाराशिव वरील प्रमाणे आटी स्थापन केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन व इतरही मातंग समाजाचे प्रश्न आपल्या माध्यमातून लवकर मार्गी लावण्यात यावे ही विनंती