*_धाराशिव जिल्ह्यात हजार उद्योजक घडवण्याचे स्वप्न – आमदार सुभाष देशमुख_*

*_धाराशिव जिल्ह्यात हजार उद्योजक घडवण्याचे स्वप्न – आमदार सुभाष देशमुख_*
*लोकमंगल बँक व मल्टीस्टेटतर्फे कर्ज मेळावा व दिवाळी स्नेहफराळ कार्यक्रम*
 तुळजापूर प्रतिनिधी :-
“_शासनाच्या अनेक लाभदायक योजना उपलब्ध आहेत. नोकरी मिळेलच याची वाट पाहण्यापेक्षा उद्योजक बनून स्वतःचा व्यवसाय सुरू करा. धाराशिव जिल्ह्यातून किमान एक हजार उद्योजक घडवण्याचे माझे स्वप्न आहे, त्यासाठी सर्वांनी पुढे यावे,_” असे प्रतिपादन लोकमंगलचे संस्थापक अध्यक्ष व आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

लोकमंगल बँक आणि लोकमंगल मल्टीस्टेट यांच्या वतीने धाराशिव येथे कर्ज विषयक मेळावा व दिवाळी स्नेहफराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. सावकाराच्या जाळ्यात अडकण्याऐवजी या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक सक्षम व्हा. स्वतःबरोबर आपले गाव आणि जिल्हाही आर्थिकदृष्ट्या सक्षम करा.”

रोहन देशमुख म्हणाले,
“प्रत्येक कार्यकर्त्याने किमान पाच उद्योजक तयार केले, तर धाराशिव जिल्हा ‘उद्योजकांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जाईल.”

यावेळी सुभाष देशमुख यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, आपण सोलापूरात गेलो असलो तरी उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्याशी आपली नाळ तुटलेली नाही. या कार्यक्रमात विविध महामंडळांकडून पाच कोटी रुपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

या कार्यक्रमास चेअरमन पंडित लोमटे, बालाजी शिंदे, सचिन आडगळे, राजेंद्र पाटील, अजय ढोणे,पांडुरंग डोलारे, तसेच लोकमंगल मल्टीस्टेटचे सीईओ सचिन जाधव,रामदास कोळगे,विक्रम (मालक) देशमुख, संतोष बोबडे,एड. दीपक आलूरे, सचिन पाटील सभापती, सज्जन साळुंखे, प्रभाकर मुळे,आनंद कंदले,यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व लोकमंगल मल्टीस्टेटचे सल्लागार, कर्जदार,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

*ओमराजे आणि कैलास पाटील शिंदे गटात येणार? प्रताप सरनाईकांचे सूचक संकेत*शिवसेनेतील इन्कमिंगमुळे ठाकरे गटाला मोठी गळती लागणार? मंत्री सरनाईकांकडून 'ऑपरेशन टायगर' राबवण्याचे संकेत विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मात्र काहीसी मरगळ आल्याचे चित्र आहे. यातच ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह काही बड्या पदाधिकाऱ्यांनीही ठाकरेंची साथ सोडली आहे. यातच आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यात 'ऑपरेशन टायगर' राबविण्याचे संकेत दिले आहेत.बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय विषयांवर देखील भाष्य केले. 'पुढे पुढे बघा काय होतंय, धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असे सूचक विधान प्रताप सरनाईकांनी केले आहे. तर 'ऑपरेशन टायगर' राबवून ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक

ऑनलाइन रम्मीच्या विळख्यातून कुटुंबाचा अंत — पत्नी व दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या